आम्ही दुसरा हमीद उभा करू शकलो नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे; पण आम्ही शेवटपर्यंत काम करू
दलवाई राजकारणी माणूस नव्हता, पण त्यांना राजकारण चांगलं समजत होतं. त्या क्षेत्रात गेले असते, तर त्यांनी उत्तम राजकारण केलं असतं. पण त्यांना समाजकार्याची आवड होती. त्याचं महत्त्व त्यांना कळत होतं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं होतं की, मंडळाच्या कामामध्ये आपल राजकीय विचार आणता कामा नयेत. म्हणून ते राजकारणापासून स्वत:ही दूर राहिले.......